Sunday, August 29, 2010

याला उत्तर काय ?

याला उत्तर काय ?
सहजच चाललेल्या गप्पांच्या ओघात एका मित्राने दोन घटना सांगीतल्या 
 प्रायमरी तल्या एका शिक्षिकेने  मुलांना निबंध लिहायला सांगीतला .
विषय होता मला काय /कोण व्हावयाचे आहे आणि देवाकडे तुम्ही काय मागाल.
सायंकाळी घरी गेल्यावर त्या एकेक नि्बंध तपासत होत्या ्तपासून झाल्यावर त्यांनी बाजूला ठेवलेला एक निबंध पुन्हा वाचायला घेतला ,त्याचे पती जेंव्हा घरी आले आणि त्यांनी बायकोला विचारले अग का रडते आहेस ? न बोलता बायकोने ती वही नवर्‍याच्या हातात ठेवली म्हणाल्या हे  वाचा जरा माझ्या एका विद्यार्थ्याने लिहीलेला निबंध आहे
" देवा मला टिव्ही कर मला टिव्हीची जागा घ्यायची आहे त्याच्यासारखे व्हायचे आहे  म्हणजे माझी मला एक जागा मिळेल घरातले सगळे माझ्या अवती भवती असतील, मी काय सागतोय त्याकडे कान देउन ऐकतील मी बोलत असताना मला कोणीही थांबवणार नाही टिव्हीकडे जसे सगळे कायम लक्ष ठेउन असतात तस्च माझ्याकडे पण लक्ष देतील बाबा अगदी खूप दमून आले तरी पण माझ्यासमोर बसतील अगदी न कुरकुरता अणि माझी आई काही कारणाने त्रासली असेल ,कंटाळली असेल तरीपण माझ्याजवळ असेल आणि माझे भाउ बहीण माझ्याजळ बसण्यासाठी भांडतील आणि घरातले सर्वजण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेउन माझ्यासाठी वेळ देतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी माझ्यामुळे घरातले सगळे आनंदी होतील.
देवा मला अजून काही नको मला टिव्ही कर मला सगळे मिळेल
हे वाचून नवरा म्हणाला " बिच्चारा ! कसे आईवडील असतात एकेक! बापरे"
बाई नवर्‍याकडे बघून म्हणतात "आपल्याच मुलाने लिहीलाय हा निबंध"

दुसरी घटना सुद्धा एका शाळेतीलच आहे
मुलांना शिक्षक विचारतात .................
तुम्हाला मोठेपणी कोण व्हावयाचे आहे 
कोणाला पायलट व्हायचे असते कोणाला इंजीनीअर, कोणाला डॉक्टर, कोणाला शिक्षक, तर कोणाला कारखाना काढायचा असतो ..प्रत्येकाला काहीतरी  व्हायचे असते एक मुलगा मात्र जे सांगतो ते ऐकून शिक्षक थक्क होतात.
तो मुलगा म्हणतो "मला व्हिलन व्हायचे आहे"
शिक्षक भांबावतात पण विचारतात "काय रे बाबा काय डोकं ठिकाणावर आहे ना?
मुलगा " सर ,कोणत्याही सिनेमात अख्खा पिक्च्रर संपेस्तोवर 
व्हिलन मज्जा करत असतो आणि हिरोची मात्र धुलाई होत असते. एव्हढेच कशाला रामायणात सुद्धा रामाला कायम त्रास आहे आणि रावण तर काय मजाच करत असतो .सीतेला पळवून नेतो तिला त्रास देतो. एव्हढा दुष्ट असून सुद्धा मेल्यावर स्वर्गात जातो कारण त्याला रामाने म्हणजे देवाने मारलेले असते"
 समाजाची चूक का आईवडीलांची चूक ?
बरोबर काय आणि चूक काय कोणी आणि कसे ठरवायचे ?

Tuesday, August 10, 2010

बेवारस नाते -डॉ. सुवर्णा नेने

ही कविता पुण्यातील सुप्रसिद्ध Implantologist  डॉ. सुवर्णा नेने यांनी केलेली आहे.
त्यांच्या दंतवैद्यकिय क्षेत्रातील ज्ञानाचाआणि त्यांच्या कौशल्याचा लाभ त्यांच्या हजारो पेशंटना मिळतच असतो, पण त्या उत्तम कविताही करतात हे मला माहीत नव्हते.
त्याची ही कविता "बेवारस नाते" माझ्या ब्लॉगवर टाकण्यास  परवानगी दिल्याबद्दल मी  त्यांचा अत्यंत आभारी आहे ही कविता त्यांच्या Clinic मधे त्यांनी लावली होती  त्यांचे लेखन कौशल्य यानिमीत्ताने सर्वांनाच दिसेल
"बेवारस नाते"
रस्त्यावरच्या त्या बेवारस कुत्र्याला,
कळणारच नाही कधि आत्ता..............
की त्याने हक्क वगैरे मागायचे नसतात !
ना कधि झोकून देउन प्रेम करायचे असते !
केंव्हातरी शिळा भाकरतुकडा फेकणार्‍या,
Socalled मालकाला विचारायचे तर नसतेच,
आज तुकडा का नाहे म्हणून?

त्याने स्विकारायचे असते फक्त सत्त्य !
Convienience चे उष्टे वाळके तुकडे !
Inconvienence मुळे पेकाटात बसलेल्या !
सणसणीत लाथेसारखेच निर्लज्जपणे !
उगीच भाकरी टाकणार्‍याला,
मालक वगैरे........... मानायचे नसते !
’ना त्याच्या भरधाव  गाडीमागे,
छाती फुटेपर्यंत पळायचे असते !

पण कळलेच नाही त्या वेड्याला!
जगात दिसते तसे काहीच नसते!
भरधाव गाडीने उडवुन रस्त्यावर !
गतप्राण झाल्यावरही,
त्याला कढिच उमगणार नसते
सामाजीक बांधीलकीत जखडलेल्या
त्या Socalled पांढरपेशा मालकाला,
उगीच हळहळून त्या बेवारश्याशी
असलेले नाते
आता जगजाहीर करणे
Convienient नसते !

डॉ. सुवर्णा नेने