Wednesday, October 06, 2010

बिग बॉस,पाकीस्तानी कलाकार आणि आपण

आपल्या देशाला त्रास देण्याची एकही संधी न सोडणार्‍या ,आपल्यावर अतिरेकी हल्ले करणार्‍या आणि भारतात अशांतता माजेल याच्याच प्रयत्नात असलेल्या पाकीस्तानातील दोन भंगार कलाकार बिग बॉस मधे हवेतच कशाला!!! 

त्यांना इथे आणून आमचे मनोरंजन होईल असे बिग बॉस च्या निर्लज्ज निर्मात्यांना वाटत असेल ... तर त्यांचा TRP खाली आणणे हे आपल्या नक्कीच हातात आहे.

नालायक पाकिस्तानी येथे नकोत पण त्याबरोबर कसाब तसेच टायगर मेमन सारख्या देशद्रोही अतिरेक्यांचे वकीलपत्र घेणाऱ्या अब्बास काझमी यालाही या कार्यक्रमातून काढले पाहिजे. अब्बास काझमी, हेडलीला मदत करणाऱ्या राहुल भट यांना प्रसिद्धी देणे म्हणजे सर्व भारतीयांच्या जखमेवर मीठ टाकण्याप्रमाणे आहे. असे कार्यक्रम पाहणे म्हणजे आपणच देशविघातक प्रवृतींना खतपाणी घातल्या सारखे होणार आहे.
सुरुवात आपण हा कार्यक्रम न पाहून व अशा वाहिनीवर बहिष्कार टाकून करूयात.
 

जयहिंद!!!

9 comments:

  1. मी आपल्या मताशी सहमत आहे परंतु वैचारिक स्वातंत्राच्या नावखाली आपल्या देशात खूप कीड आहे इतरापासून आपण वेगळे आहोत हे दाख्वाण्य्याचा नादात लोक देशप्रेम विसरतात

    ReplyDelete
  2. नक्कीच हा प्रकार निंदनीय आहे. झी वरच्या सारेगमप मधे पण एक पाकिस्तानी कलाकार आहे, खुर्रम का काहीतरी, त्याच्याविषयी आपल काय मत आहे? त्याच्या विरोधात का कुणी आवाज नाही काढत?

    ReplyDelete
  3. ज्या ज्या channel वर पाकिस्तानातुन आलेल्यांना घेतले जाते त्या channel वर ,व त्या त्या programmes वर ज्या मालांच्या जाहिराती असतील त्या मालावर बहिष्कार लोकांनी टाकला पाहिजे. FB वर हि channels असतील तर messages द्वारा निषेध नोंदवला गेला पाहिजे.
    (Dilip Patwardhan)

    ReplyDelete
  4. बीग बॉसच काय पण भारतातील कोणत्याच कार्यक्रमामध्ये पाकड्यांना सामील करुन घेवु नये या मताचा मी आणि समस्त देशप्रेमी मंडळी आहेत. फक्त भारतव्देष हीच ज्यांची संस्कृती आहे त्यांना आपल्याकडे बोलवताच कशाला ? त्या वाहीनीचा उद्देश काहीही असुदेत आपण भारतीयांनी त्या वाहीनीवरच बहीष्कार टाकला तरच त्यांचे डोळे उघड्तील, त्या संदर्भात आपणच जनजागृती करुयात.आपण हा विषय उचललात त्याबद्द्ल आपले अभिनंदन

    ReplyDelete
  5. आजच त्या रफ मुशर्रफने नालायकपणे कबुली दिली की त्याने अध्यक्ष असताना अतिरेकी तयार केले आणि कारगील युद्धात भारत भुमीवर पाठवेले. सापाला दूध पाजून उपयोग नाही त्याला ठेचलाच पाहिजे.

    ReplyDelete
  6. thats the spirit every indian should be proud of bhikari media ani tyanch gunagan karnare barkha sarkhe lok yanna lathach ghatlya pahijetp

    ReplyDelete
  7. सल्लू बाबा आणि त्याचे चौदा चोर सगळेच एकाला एक सरस नमुने आहेत, अश्याप्रकारचे प्रोग्राम फक्त पैसा कमावण्यासाठी बनतात

    ReplyDelete
  8. सर्व प्रथम याविषयाला तोंड फोडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
    जेव्हा आपल्यासर्वांसारखे नागरिक हे सहन करीत बसतात तेव्हाच हे प्रकार वाढतात. आज सर्वच मिडिया मध्ये प्रत्येक विषयाचा इवेन्ट करण्याची स्पर्धा लागली आहे. व त्यातूनच असले तद्दन गल्लाभरू कार्यक्रम चालू होतात.
    मिडिया यादेशातील सर्व कायद्यांचा व नीतिमत्तेचा ठेका घेतल्यासारखी वागत असते. कालच नालायक व भेकड परवेझ मुशरफ खुल्या मुलाखतीत सांगतो कि पाकिस्तानातच अतिरेकी तयार करून ते भारतात विद्वांश करयला पाठवले जातात. या अतिरेकी हल्ल्यात अनेक अधिकारी व निष्पाप नागरिक बळी पडले आहेत. या हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबियांना अब्बास काझमी सारख्यांना एखाद्या हिरोसारखे वावरताना पाहून किती यातना होत असतील. याच काझमीने जीवाची बाजी लावून देशवासीयांचे रक्षण केलेल्या वीर जवानांची उलट तपासणी केली असेल. या शूर वीरांना खोटे पडून नालायक कसाबला निरपराध ठरवायचा प्रयत्न केला असेल. यदा कदाचित हा नालायक दलाल जर विजेता ठरला तर आपल्या देशाचा, सीमेवरील जवानांचा किती अपमान होईल.
    आज colour हि वाहिनी big boss मधून काय सिद्ध करू पहात आहे? का या पाकिस्तानी कलाकारांना पुढे करून देशातील नागरीकांन कडून उलट जास्त sms मिळतील व या वाहिनीला व मोबाईल कंपन्यांना जास्तच फायदा होईल याचा विचार चालू असेल. हे म्हणजे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्या सारखेच आहे.
    यामुळे या वाहिनी वर संपूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे. आपण प्रत्येकाने याचा जास्तीत जास्त प्रचार केला पाहिजे. पुढे येवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. या वाहिन्या केवळ हीच भाषा कळते.
    जय हिंद.

    ReplyDelete
  9. सर्व प्रथम याविषयाला तोंड फोडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
    मिडिया यादेशातील सर्व कायद्यांचा व नीतिमत्तेचा ठेका घेतल्यासारखी वागत असते. कालच नालायक व भेकड परवेझ मुशरफ खुल्या मुलाखतीत सांगतो कि पाकिस्तानातच अतिरेकी तयार करून ते भारतात विद्वांश करयला पाठवले जातात. या अतिरेकी हल्ल्यात अनेक अधिकारी व निष्पाप नागरिक बळी पडले आहेत. या हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबियांना अब्बास काझमी सारख्यांना एखाद्या हिरोसारखे वावरताना पाहून किती यातना होत असतील. याच काझमीने जीवाची बाजी लावून देशवासीयांचे रक्षण केलेल्या वीर जवानांची उलट तपासणी केली असेल. या शूर वीरांना खोटे पडून नालायक कसाबला निरपराध ठरवायचा प्रयत्न केला असेल. यदा कदाचित हा नालायक दलाल जर विजेता ठरला तर आपल्या देशाचा, सीमेवरील जवानांचा किती अपमान होईल.
    आज colour हि वाहिनी big boss मधून काय सिद्ध करू पहात आहे? का या पाकिस्तानी कलाकारांना पुढे करून देशातील नागरीकांन कडून उलट जास्त sms मिळतील व या वाहिनीला व मोबाईल कंपन्यांना जास्तच फायदा होईल याचा विचार चालू असेल. हे म्हणजे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्या सारखेच आहे.
    यामुळे या वाहिनी वर संपूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे. आपण प्रत्येकाने याचा जास्तीत जास्त प्रचार केला पाहिजे. पुढे येवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. या वाहिन्या केवळ हीच भाषा कळते.
    जय हिंद.

    ReplyDelete