Wednesday, September 29, 2010
कॉमनवेल्थ गेम्स दिल्लीतील स्टेडीयम
मी नुकतेच तेथील स्टेडीयमचे काही फोटो पाहीले आणि मला असे वाटते की तेथे चांगली कामेसुद्धा झालेली आहेत पण त्यांना योग्य प्रसिद्धी मिळालेली नाही
त्यातील काही फोटो मी येथे पोष्ट केले आहेत
मला असे वाटते की काय झाले यापेक्षा काय दिसते आहे हे महत्वाचे आहे
तसेच कॉमनवेल्थ स्पर्धा यशस्वी झाली तर आपल्या देशाची प्रतीमा मलीन होणार नाही
याचा प्रत्येकाने विचार केला पाहीजे.
भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचे उद्योग यावर कॉमनवेल्थ स्पर्धा संपल्यावर चर्चा आणि कारवाई करता येइल आजतरी कॉमन वेल्थ स्पर्धा यशस्वी करणे ऎवढेच बघायला हवे
Tuesday, September 14, 2010
रुपया गेला कुठे????
तीन माणसे एका दुकानात जातात
त्यांना एक वस्तू खरेदी करायची असते ,दुकानातील नोकर त्यांना ती दाखवतो
वस्तुची किंमत असते ३०रुपये.
दुकानातला नोकर त्यांच्याकडून रु.३०/= घेतो.
तिघेजण प्रत्येकी १० रुपये देतात.
थोड्या वेळाने मालक आल्यावर नोकर त्यांला ते पैसे देतो आणि सांगतो कि मी अमुक अमुक वस्तु ३० रुपयांना विकली. मालक म्हणतात अरे त्याची किंमत २५ रुपयेच आहे तू ५ रुपये जास्त घेतलेस. तेंव्हा हे ५ रुपये घे आणि त्यांना देउन ये.
नोकर मनात म्हणतो कशाला त्यांना परत द्यायला हवेत पाचच्या पाच मग तो बाहेर जातो २ रुपये खिशात घालतो आणि ३रुपये त्याना नेउन देतो.
ते तिघे प्रत्येकी १ रुपया वाटुन घेतात ,
म्हणजे त्या तिघांनी प्रत्येकी ९ रुपये दिले म्ह्यणजे तिघांचे २७ रुपये झाले ,
नोकराने २ रुपये घेतले
म्हणजे एकूणझाले २९ रुपये
मग राहीलेला रुपया गेला कुठे????
बघा सापडतोय का???
Sunday, August 29, 2010
याला उत्तर काय ?
सहजच चाललेल्या गप्पांच्या ओघात एका मित्राने दोन घटना सांगीतल्या
प्रायमरी तल्या एका शिक्षिकेने मुलांना निबंध लिहायला सांगीतला .
विषय होता मला काय /कोण व्हावयाचे आहे आणि देवाकडे तुम्ही काय मागाल.
सायंकाळी घरी गेल्यावर त्या एकेक नि्बंध तपासत होत्या ्तपासून झाल्यावर त्यांनी बाजूला ठेवलेला एक निबंध पुन्हा वाचायला घेतला ,त्याचे पती जेंव्हा घरी आले आणि त्यांनी बायकोला विचारले अग का रडते आहेस ? न बोलता बायकोने ती वही नवर्याच्या हातात ठेवली म्हणाल्या हे वाचा जरा माझ्या एका विद्यार्थ्याने लिहीलेला निबंध आहे
" देवा मला टिव्ही कर मला टिव्हीची जागा घ्यायची आहे त्याच्यासारखे व्हायचे आहे म्हणजे माझी मला एक जागा मिळेल घरातले सगळे माझ्या अवती भवती असतील, मी काय सागतोय त्याकडे कान देउन ऐकतील मी बोलत असताना मला कोणीही थांबवणार नाही टिव्हीकडे जसे सगळे कायम लक्ष ठेउन असतात तस्च माझ्याकडे पण लक्ष देतील बाबा अगदी खूप दमून आले तरी पण माझ्यासमोर बसतील अगदी न कुरकुरता अणि माझी आई काही कारणाने त्रासली असेल ,कंटाळली असेल तरीपण माझ्याजवळ असेल आणि माझे भाउ बहीण माझ्याजळ बसण्यासाठी भांडतील आणि घरातले सर्वजण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेउन माझ्यासाठी वेळ देतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी माझ्यामुळे घरातले सगळे आनंदी होतील.
देवा मला अजून काही नको मला टिव्ही कर मला सगळे मिळेल
हे वाचून नवरा म्हणाला " बिच्चारा ! कसे आईवडील असतात एकेक! बापरे"
बाई नवर्याकडे बघून म्हणतात "आपल्याच मुलाने लिहीलाय हा निबंध"
दुसरी घटना सुद्धा एका शाळेतीलच आहे
मुलांना शिक्षक विचारतात .................
तुम्हाला मोठेपणी कोण व्हावयाचे आहे
कोणाला पायलट व्हायचे असते कोणाला इंजीनीअर, कोणाला डॉक्टर, कोणाला शिक्षक, तर कोणाला कारखाना काढायचा असतो ..प्रत्येकाला काहीतरी व्हायचे असते एक मुलगा मात्र जे सांगतो ते ऐकून शिक्षक थक्क होतात.
तो मुलगा म्हणतो "मला व्हिलन व्हायचे आहे"
शिक्षक भांबावतात पण विचारतात "काय रे बाबा काय डोकं ठिकाणावर आहे ना?
मुलगा " सर ,कोणत्याही सिनेमात अख्खा पिक्च्रर संपेस्तोवर
व्हिलन मज्जा करत असतो आणि हिरोची मात्र धुलाई होत असते. एव्हढेच कशाला रामायणात सुद्धा रामाला कायम त्रास आहे आणि रावण तर काय मजाच करत असतो .सीतेला पळवून नेतो तिला त्रास देतो. एव्हढा दुष्ट असून सुद्धा मेल्यावर स्वर्गात जातो कारण त्याला रामाने म्हणजे देवाने मारलेले असते"
समाजाची चूक का आईवडीलांची चूक ?
बरोबर काय आणि चूक काय कोणी आणि कसे ठरवायचे ?
Tuesday, August 10, 2010
बेवारस नाते -डॉ. सुवर्णा नेने
त्यांच्या दंतवैद्यकिय क्षेत्रातील ज्ञानाचाआणि त्यांच्या कौशल्याचा लाभ त्यांच्या हजारो पेशंटना मिळतच असतो, पण त्या उत्तम कविताही करतात हे मला माहीत नव्हते.
त्याची ही कविता "बेवारस नाते" माझ्या ब्लॉगवर टाकण्यास परवानगी दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे ही कविता त्यांच्या Clinic मधे त्यांनी लावली होती त्यांचे लेखन कौशल्य यानिमीत्ताने सर्वांनाच दिसेल
कळणारच नाही कधि आत्ता..............
की त्याने हक्क वगैरे मागायचे नसतात !
ना कधि झोकून देउन प्रेम करायचे असते !
केंव्हातरी शिळा भाकरतुकडा फेकणार्या,
Socalled मालकाला विचारायचे तर नसतेच,
आज तुकडा का नाहे म्हणून?
त्याने स्विकारायचे असते फक्त सत्त्य !
Convienience चे उष्टे वाळके तुकडे !
Inconvienence मुळे पेकाटात बसलेल्या !
सणसणीत लाथेसारखेच निर्लज्जपणे !
उगीच भाकरी टाकणार्याला,
मालक वगैरे........... मानायचे नसते !
’ना त्याच्या भरधाव गाडीमागे,
छाती फुटेपर्यंत पळायचे असते !
पण कळलेच नाही त्या वेड्याला!
जगात दिसते तसे काहीच नसते!
भरधाव गाडीने उडवुन रस्त्यावर !
गतप्राण झाल्यावरही,
त्याला कढिच उमगणार नसते
सामाजीक बांधीलकीत जखडलेल्या
त्या Socalled पांढरपेशा मालकाला,
उगीच हळहळून त्या बेवारश्याशी
असलेले नाते
आता जगजाहीर करणे
Convienient नसते !
डॉ. सुवर्णा नेने
Wednesday, June 09, 2010
बेवड्याची प्रतीज्ञा
बारच
माझा देश आहे
...
सारे
बेवडे माझे बांधव आहेत.
माझ्या
ब्रॅंडवर माझे प्रेम आहे.
बारमधिल
सर्व प्रकारच्या अल्कोहोलचा मी मान ठेविन.
माझ्या
बारमध्ये आनंदाने आणी विविधतेने झुलणारया बेवड्यांचा
मला अभिमान आहे.
माझा
बार आणी माझी दारू यातच माझी सौख्य सामावलेले आहे.
जय
दारू
चला पटकन एक पेग मारू
Monday, May 17, 2010
मोनालिसा --म्युझियम बंद झाल्यावर मोनालिसा
Tuesday, September 22, 2009
मराठी माणूस आणि व्यवसाय
मराठी माणूस आणि व्यवसाय
खरे खोटे मला माहिती नाही पण पुढे सांगीतलेल्या कथेतील घटना अगदिच अशक्य आहे असे मात्र नाही.
एका सरकारी खात्याचे एक टेंडर निघालेले असते , नेहेमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्याचे बजेट ठरवलेले असते, की या प्रोजेक्ट्चा खर्च रू.१५ लाख येइल .
अनेक जणांच्या कोटेशन मधून तीन जणांना साहेब चर्चेला बोलावतात .
पहीला येतो आमचा मराठी माणूस...............
साहेब-
आता बघा आमचा अंदाज होता १५ लाखाचा पण तुमचे कोटेशन आहे २० लाखाचे ,सांगा कसे काय करायचे?
सांगा किती कमी करताय?
मराठी माणूस—
हे बघा साहेब जे काय कोटेशन भरले आहे ते अगदी बरोबर आहे यात काही कमी होणार नाही ,आ्म्ही क्वालीटीत काहीही तड्जोड करत नाही, सर्व पार्ट अस्सल वापरतो आमच्याकडे डुप्लिकेट माल वापरत नाही, अहो आमचा ख्रर्चच मुळी १८ च्या घरात जातोय ,त्यामुळे यामधे काहीही कमी होणार नाही.
साहेब –
बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.
यानंतर येतो एक सरदारजी
साहेब-
बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय २५ लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?
२५ लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?
सरदार-
क्या साहबजी समझ लो महंगाइ कितना बढ गया है ,हर चीज का दाम बढ गया है, हमे पता है आपको टाँप क्वालिटी चाहिये ,तो हम भी टाँप क्वालिटी का माल देंगे,और आप्को भी मालूम है आपके ऑफ़ीस मे भी हर जगह देना पडता है
साहेब-
फिर भी हे जरा जास्तच होतात
सरदार-
क्या साहबजी समझ लो आपको भी इसमे दो रखा है
साहेब –
बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.
यानंतर येतो एक मारवाडी
साहेब-
बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय ३० लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?
३० लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?
मारवाडी-
सायेब ते सर्व जरा बाजूला ठेवा आणि आमचे ऐका कोणि काय कोटेशन भरलय आम्हाला सगळं म्हायतीय
आपण असे करा तुम्ही ऑर्डर आमच्या नावाने काढा आम्ही त्या मराठी माणसाकडून काम करून घेतो त्याचे त्याला पैसे देवून टाकतो ,तुम्ही पेमेंट्चे काम त्यवढे लवकर करा ,त्या मराठी माणसाकडून आम्ही १५ लाख देवून काम करून घेतो वरच्या १५ तले निम्मे तुमचे निम्मे आमचे.
पुढे काय झाले ते सांगायला नकोच नाही कां???









