Thursday, August 18, 2016

ऑलिंपिक स्पर्धा आणि भारत- साक्षी मलिक आणि पी व्ही सिंधु # Rio Olympics #Sakshee Malik # PV Sindhu

झोंबरे वास्तव
ज्या देशात कुंभमेळ्यातील भुक्कड साधूंवर देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त खर्च होतो , त्या देशाने खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा ठेवु नये.
खेळात भाग घेणे आणि प्रेक्षकांची मने जिंकणे हे पदकापेक्षा जास्त महत्वाचे आहे असे ज्या देशात सांगितले जाते त्या देशाला पदके कशी मिळणार ?
ज्या देशातील क्रिडा संघटनांचे प्रमुख कोणताही खेळ न खेळता केवळ त्यांच्या राजकिय संबंधांमुळे वर्षानुवर्षे या संघटनांवर राज्य करतात
आणि
जोपर्यंत या संघटनांवर मरायला टेकलेली म्हातारी गिधाडे बसलेली आहेत तोपर्यंत Olympic मधे आपली प्रगती होणे अवघड आहे.
आज रक्षाबंधनाच्या दिवशी दोन मुलिंनी भारताची लाज राखली 
सकाळी साक्षी मलिकने महिला कुस्तीतले पहिले  ब्रॉंझ पदक मिळवले
आणि रात्री सिंधुने सुवर्णपदकाकडे झेप घेतली आहे.

यात दोघींच्या घरच्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि त्यांच्या गुरूंनी दिलेले प्रशिक्षण यांचा मोठा वाटा आहे.
दोघींच्या जिद्दीला सलाम

Wednesday, February 25, 2015

माननिय छगन भुजबळसाहेब तुमचा सल्ला हवा आहे

http://www.loksatta.com/mumbai-news/

भुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची?

आजच्या लोकसत्तेतील बातमी

 माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबीयांपुढील अडचणी आता वाढतच असून तब्बल २६५३ कोटींची मालमत्ता असल्याच्या आरोपप्रकरणी खुली चौकशी करण्यास शासनाने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परवानगी दिली आहे.

दमानिया यांच्या पत्रातील माहितीप्रमाणे भुजबळ कुटुंबीयांची मालमत्ता
नाशिक येथे चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म, राम बंगला, गणेश बंगला, येवला व मनमाड येथे कार्यालय व बंगला, दिंडोरीत १०० वायनरीसाठी एकर भूखंड, वरळीत सुखदा सोसायटीत १२०० चौरस फुटांचा फ्लॅट, चर्चगेट येथील मानेक महल येथे अडीच हजार चौरस फुटांची कार्यालये
माहिम येथे फ्लॅट, नवी मुंबईत दुकाने, १०० कोटींची चित्रे व इतर पुरातन वस्तू, जुहूतील वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट, इंडोनेशियात खाणी, नाशिक येथे वीज कंपनी, शिलापूर येथे १५ एकर भूखंड, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचा अडीचशे एकर भूखंड, साखर कारखाना
साडेचारशे एकरवर भुजबळ वाइन्स, देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावे खारघर येथे २५ एकर भूखंड, नीश इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचे दादर परिसरात व्यापारी इमारती, सांताक्रूझ येथे निवासी इमारत, लोणावळा येथे ६५ एकर भूखंड, येवला व बाभुळगाव येथे अनुक्रमे २६ व ६५ एकर भूखंड, उज्जनी येथे ३५० एकर भूखंड आदी.


भुजबळ्साहेब  तुमच्या वेबसाईट्वर ( http://www.chhaganbhujbal.org/p2.html    )
लिहील्याप्रमाणे "तुमचे  बालपण अतिशय हलाखीत गेले घरची परिस्थीती अत्यंत गरिबीची होती आणि  तुमच्या उत्पन्नाचे साधन म्हणजे म्युनिसिपल मार्केट मधील भाजीचा एक गाळा होता."
नंतर आपण शिवसेनेत गेलात, मुंबईचे महापौर झालात, आमदार झालात.

महाराष्ट्राच्या राजकारणातही आपण खुप नाव कमावले आहे. आधी मंत्री नंतर उपमुख्यमंत्री झालात,
अत्यंत दैदिप्यमान कारकिर्द आहे तुमची.
दरम्यानच्या काळातील आपले समाजकार्यही सर्वश्रुतच आहे.शिक्षणक्षेत्रातही आपले नाव मोठे आहे.

मात्र आजच्या लोकसत्तेतील ही बातमी वाचुन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे,खरे म्हणायचे तर सल्ला विचारायचा आहे.
आपण जर  हे वैभव कसे मिळवायचे ते सर्वसामांन्यांना  सांगीतले तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची  गरिबी दूर होईल, सर्वत्र आनंदी आनंद होइल .
देवांच्या फोटोबरोबर आपलाही फोटो घराघरात दिसेल .


Monday, August 11, 2014

पुणे विद्यापिठाचा नामविस्तार नामांतर

पुणे विद्यापिठाचा नामविस्तार करून आता त्याला सावित्रीबाई फुले यांचे  नाव देण्यात आले . ह्या नामविस्तारासाठी किती जणांनी अथक परिश्रम घेतले ते काही दिवसांपूर्वी विद्यापिठाबाहेर आणि गावभर लागलेल्या होर्डींगवरूनच कळले .
श्री शरद पवार साहेबांनी त्याच कार्यक्रमाचे वेळी  सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यात  यावे अशी सूचना केली .
या बाबतीत माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार ??
पण काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ पुणे विद्यापिठाचा नामविस्तार आत्ताच्या आत्ता करा नाही तर मी मंत्रीं मंडळाच्या बैठकीस उपस्थीत राहणार नाही म्हणून रुसून बसल्याचे आपण सर्वांनीच टिव्हीवर पाहिले होते .
त्याना होणारे दुःख खरोखरच बघवत नव्हते .(राजीनामा नाही दिला)
खरेतर छगन भुजबळांकडे या दुःखातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग होता. नाशिक मधे असलेल्या त्यांच्या भुजबळ नॉलेज सिटीला सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याना सहज देता आले असते.
पण साहेबांनी ही संधी दवडली .
पण काही हरकत नाही अजुनही ते त्याच्या संस्थेला कोणाचे तरी नाव देउ शकतात .
खरेतर महारष्ट्रातील अनेक खाजगी विद्यापिठे नामविस्तारासाठी अजुनही उपलब्ध आहेत
आणि आपल्या देशात राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रासाठी आपले बलिदान देणार्‍या महिलांचा सन्मान होईल .
१.भुजबळ नॉलेज सिटी
२.भारती विद्यापिठ
३. डि. वाय. पाटील विद्यापिठ
४ दता मेघे मेडिकल कॉलेज विद्यापिठ
५. एम जी एम इन्स्टिटुट ऑफ मेडिकल सायन्सेस
६. विद्या प्रतिष्ठान बारामती
७. प्रवरा इन्स्टिटुट ऑफ मेडिकल सायन्सेस
 आणि इतर अनेक...............................................
आता तरी मला इतकीच आठवली

नेते हो बघा विचार करा .
निवडणुकीपुर्वी हि संधी तुम्हा्ला उपलब्ध आहे
त्वरा करा
आचार संहिता कधिही लागू होईल