Wednesday, November 09, 2011

लग्नसमारंभ आणि प्रथा........................ 
एका मंगल कार्यालयाच्या पायर्‍या चढत असताना "आले आले" असा गलका ऐकू आला आणि मागाहून होणारी गडबड बघून जरा बाजूला झालो.
 नवरदेवांचे आगमन झाले होते आणि वधूकडील नातेवाईक मंडळींची धावपळ सुरू झाली होती.
 दारात येउन वधूच्या आईने वराला औक्षण केले त्याचे आणि वरमाईचे पाय दूधाने धुतले आणि पायघड्या घालत त्यांना आत नेले.
 नंतर दिवसभर अशाच पद्धतीने मुलाकडच्यांपुढे हांजी हांजी करणे चालूच होते.
 फोटो काढायचेत आधी मुलाकडच्यांचे काढणार.....
पंगत बसलीय आधी मुलाकडच्यांचे जेवायला बसणार....
असे अनेक प्रसंग दिवसभर घडत होते आणि मुलीचे नातेवाईक तत्परतेने आणि ब‍र्‍याच वेळा नाइलाजास्तव करत होते.
बर्‍याच वेळा लग्नांमधे वादाचे प्रसंग येतात आणि त्याला अश्या जुनाट प्रथाच कारणीभूत असतात. आपल्याकडील बहुतेक लग्ने अशीच होतात मी हे जे काही पाहीले अनुभवले ते काही विशेष होते असे नाही, पण हे असे का आणि कशासाठी असा प्रश्न मला कायम पडतो.
 नवरामुलगा आणि त्याचे नातेवाईक यांना खास वागणूक देण्याची ही पद्धत स्त्रीयांना ५०% आरक्षण देण्यार्‍या या एकविसाव्या शतकात अजुनही सुरूच आहे याचे मलातरी नेहेमीच आश्चर्य वाटते.
 मला असे नाही म्हणायचे की मु्लाकडच्यांना मान अजीबात देउ नये,.... जरूर द्यावा... पण तितकाच मान मुलीकडच्यांना पण द्यायला नको का?
 मुलीकडची बाजू म्हणजे पडती बाजू असे का असते?
 लग्न म्हणजे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन घराण्यांना एकत्र आणणारी गोष्ट असेल तर एकमेकांना योग्य तो मानसन्मान देउन करायला काय हरकत आहे!!!
 हे सर्व लिहीण्याचे कारण की काही दिवसापूर्वी मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाउन आलो तेथील हा अत्यंत आनंददायी वेगळा अनुभव..............
 हा लग्नसमारंभ म्हणजे दोन्हीकडच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींचे get together होते.
एकही दुर्मुखलेला चेहरा दिसला नाही.
 लग्न नोंदणी पद्धतीने झाले आणि नंतर स्वागत समारंभ होता. पण आपण नेहेमी बघतो तसा मात्र नाही.

नेहमीच्या स्वागत समारंभाला फाटा देऊन एक उत्तम पार्टी झाली.
प्रवेशद्वारात मुलामुलीचे आई वडील हसतमुखाने पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे राहीले होते अणि जिव्हाळ्याने प्रत्येकाशी दोन शब्द बोलून त्यांचे स्वागत करत होते.
बर्‍यार्पै‍की मंडळी जमल्यावर नवरा नवरीने प्रवेश  केला आणि जमलेल्या सर्वांनी त्यांचे उभे राहून
टाळ्यांच्या कडकडात  स्वागत केले .
 पार्टी सुरू करण्यापूर्वी नवरा नवरी मध्यभागी उभे राहीले आणि त्यांच्या एका मित्राने त्यांचे लग्न कसे ठरले त्याची स्टोरी खुसखुशीतपणे सांगीतली आणि नंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची ओळख सगळ्यांना करून दिल्यानंतर एका भन्नाट  आणि धमाल पार्टीला सुरुवात झाली.

 पार्टीत सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती, Orchestra होता, उत्तम संगीत होते, डान्सफ़्लोअर होता

 मुख्य म्हणजे मुलगा मुलगी स्टेजवर खोटं खॊटं हसत पाहुण्यांना भेटण्याऐवजी पाहुण्यांमधे हिंडत फिरत त्यांना भेटत होते आणि दोघेही उत्तम डान्सर असल्यामुळे डान्सपण करत होते.
त्यांना एका उत्तम बॅंडची साथ होती.
 दोघांनी आलेल्या प्रत्येकाला थोडा वेळ का होइना डान्स करायला लावलाच . पुढ्चे तीन तास कसे गेले हे कोणालाच कळ्ले नाही .
 समारंभाची सांगता मुलीच्या मोठ्या भावाने स्वत: लिहीलेले आणि चाल दिलेल्या गाण्याने झाली .

 काळानुरूप आपणही बदलायला काय हरकत आहे.
 नवपरिणीत वधुवर आणि आलेल्या सर्वांनाच माझा सलाम.....................

9 comments:

  1. लग्न नोंदणी पद्धतीने झाले>>>>>> ithach tar ghod adat naa :(

    ReplyDelete
  2. सुंदर लेख, विचार आणि कल्पना संजय जी.

    हा लेख वाचून लग्न जमलेल्या जोडप्यांनी काही शिकवण घ्यावी.

    माझा ही लग्न समारंभाचा एक अनुभव आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे.
    http://www.haushilekhak.com/2010/07/blog-post_18.html

    ReplyDelete
  3. well said Sir. Phaar chhaan.. Ekikade 'tradition' japnyasaathi anek lok junaat padhatiney sohala kartat...tyaamule bursatlelya rudhinna khat-paani ghaaltaat.
    Ironically, it is the women who keep on encouraging out-dated traditions like, paay- dhune, maan-paan etc, in effect keeping the age-old gender bias alive.

    ReplyDelete
  4. Nicely worded.
    (Dilip patwardhan)

    ReplyDelete
  5. hi sanjay,yes, the marriage ceremony was definitely an occassion to remember.and very rarely do we such see celebrations.most of us like to bind by traditional rituals and dont want to come out of it.some practice the traditional way coz they love it that way! but change is the constant factorin our life.unbiased treatment for the fairer sex should be practised not only during marriage but also in our day to day routine.rarely do women have a voice in our culture.so lets change this and give them the respect they deserve( as was done in this marriage ceremony)but on an ongoing basis.kalanurup badlaylach havech.

    ReplyDelete
  6. good article because of thiskind of celebrations events like marriage receptions become more interactive than just a formal evening. hope you wil also agree raya

    ReplyDelete
  7. ब्लॉगला नुसती भेटच नाही तर कॉमेंट सुद्धा टाकल्याबद्दल धन्यवाद
    जाता जाता एक आठवले ही लिंक क्लिक करा
    http://www.youtube.com/watch?v=4-94JhLEiN0
    लग्नात काय धमाल करतात ते बघा

    ReplyDelete