Thursday, November 24, 2011


अण्णा..... अहो जरा विचार करून बोला


शरद पवारांसारख्या बुजूर्ग नेत्यावर एका माथेफिरूने हला केला या घटनेचा प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्याने निषेध केला.
पण अण्णा हजारेंना याबद्दल विचारले असता अण्णांची पहिली प्रतिक्रिया होती
क्या एकही मारा?" …..एकदाच मारले?
व्हिडीओ लिंक http://www.youtube.com/watch?v=xWH4_NxU5E0
काय अण्णा!! काय बोलताय तुंम्ही!! अहो पवारसाहेबांबद्दल तुम्हाला राग असेलही पण हे जे काय तुम्ही बोललात ते चूकच आहे. सर्वच राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात रोष आहे पण म्हणून कोणि त्यांना मारहाण करायला जात नाही.
निषेध करण्याच्या अनेक पद्धती आणि सर्वमान्य मार्ग आहेतच की.
नंतर तुम्ही या घटनेचा आता कितीही वेळा निषेध केलात तरी तुमच्या मनात काय आहे ते कळलेच.
राळेगणसिद्धीतल्या दारूडयाला खांबाला बांधून मारणे वेगळे आहे आणि खरेतर चूकही आहे.
आणि अण्णा जनतेने तुंम्हाला मोठेपणा दिला याचा अर्थ असा नव्हे की आपण प्रत्येक विषयात आपण बोलायलाच पाहीजे

मी कायम  महात्मा गांधींच्या विचाराने जाणारा आहे असे तुंम्ही म्हणता मग हे काय बोलताय?

तुमच्या प्रतीक्रियेवर शरद पवारसाहेब बरोबर म्हणाले की " गांधीवादाची नवी व्याख्या आम्हाल कळली"

अण्णा हल्ली प्रत्येक घटनेबद्दल तुम्हाला पत्रकार आणि सामान्य लोक तुमचे मत काय असे विचारतात ,तुमचे नाव भारत भरच काय कदाहित जगभरही झाले असेल ,अण्णा तुमच्यामुळे लोकपाल येईल, तुमच्यामुळे माहीतीचा कायदा आला ,तुमच्यामुळे ग्रामविकास झाला हे अगदी बरोब्बर. 
पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मतप्रदर्शन करायला हवेच का?   

Wednesday, November 09, 2011

लग्नसमारंभ आणि प्रथा........................ 
एका मंगल कार्यालयाच्या पायर्‍या चढत असताना "आले आले" असा गलका ऐकू आला आणि मागाहून होणारी गडबड बघून जरा बाजूला झालो.
 नवरदेवांचे आगमन झाले होते आणि वधूकडील नातेवाईक मंडळींची धावपळ सुरू झाली होती.
 दारात येउन वधूच्या आईने वराला औक्षण केले त्याचे आणि वरमाईचे पाय दूधाने धुतले आणि पायघड्या घालत त्यांना आत नेले.
 नंतर दिवसभर अशाच पद्धतीने मुलाकडच्यांपुढे हांजी हांजी करणे चालूच होते.
 फोटो काढायचेत आधी मुलाकडच्यांचे काढणार.....
पंगत बसलीय आधी मुलाकडच्यांचे जेवायला बसणार....
असे अनेक प्रसंग दिवसभर घडत होते आणि मुलीचे नातेवाईक तत्परतेने आणि ब‍र्‍याच वेळा नाइलाजास्तव करत होते.
बर्‍याच वेळा लग्नांमधे वादाचे प्रसंग येतात आणि त्याला अश्या जुनाट प्रथाच कारणीभूत असतात. आपल्याकडील बहुतेक लग्ने अशीच होतात मी हे जे काही पाहीले अनुभवले ते काही विशेष होते असे नाही, पण हे असे का आणि कशासाठी असा प्रश्न मला कायम पडतो.
 नवरामुलगा आणि त्याचे नातेवाईक यांना खास वागणूक देण्याची ही पद्धत स्त्रीयांना ५०% आरक्षण देण्यार्‍या या एकविसाव्या शतकात अजुनही सुरूच आहे याचे मलातरी नेहेमीच आश्चर्य वाटते.
 मला असे नाही म्हणायचे की मु्लाकडच्यांना मान अजीबात देउ नये,.... जरूर द्यावा... पण तितकाच मान मुलीकडच्यांना पण द्यायला नको का?
 मुलीकडची बाजू म्हणजे पडती बाजू असे का असते?
 लग्न म्हणजे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन घराण्यांना एकत्र आणणारी गोष्ट असेल तर एकमेकांना योग्य तो मानसन्मान देउन करायला काय हरकत आहे!!!
 हे सर्व लिहीण्याचे कारण की काही दिवसापूर्वी मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाउन आलो तेथील हा अत्यंत आनंददायी वेगळा अनुभव..............
 हा लग्नसमारंभ म्हणजे दोन्हीकडच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींचे get together होते.
एकही दुर्मुखलेला चेहरा दिसला नाही.
 लग्न नोंदणी पद्धतीने झाले आणि नंतर स्वागत समारंभ होता. पण आपण नेहेमी बघतो तसा मात्र नाही.

नेहमीच्या स्वागत समारंभाला फाटा देऊन एक उत्तम पार्टी झाली.
प्रवेशद्वारात मुलामुलीचे आई वडील हसतमुखाने पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे राहीले होते अणि जिव्हाळ्याने प्रत्येकाशी दोन शब्द बोलून त्यांचे स्वागत करत होते.
बर्‍यार्पै‍की मंडळी जमल्यावर नवरा नवरीने प्रवेश  केला आणि जमलेल्या सर्वांनी त्यांचे उभे राहून
टाळ्यांच्या कडकडात  स्वागत केले .
 पार्टी सुरू करण्यापूर्वी नवरा नवरी मध्यभागी उभे राहीले आणि त्यांच्या एका मित्राने त्यांचे लग्न कसे ठरले त्याची स्टोरी खुसखुशीतपणे सांगीतली आणि नंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची ओळख सगळ्यांना करून दिल्यानंतर एका भन्नाट  आणि धमाल पार्टीला सुरुवात झाली.

 पार्टीत सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती, Orchestra होता, उत्तम संगीत होते, डान्सफ़्लोअर होता

 मुख्य म्हणजे मुलगा मुलगी स्टेजवर खोटं खॊटं हसत पाहुण्यांना भेटण्याऐवजी पाहुण्यांमधे हिंडत फिरत त्यांना भेटत होते आणि दोघेही उत्तम डान्सर असल्यामुळे डान्सपण करत होते.
त्यांना एका उत्तम बॅंडची साथ होती.
 दोघांनी आलेल्या प्रत्येकाला थोडा वेळ का होइना डान्स करायला लावलाच . पुढ्चे तीन तास कसे गेले हे कोणालाच कळ्ले नाही .
 समारंभाची सांगता मुलीच्या मोठ्या भावाने स्वत: लिहीलेले आणि चाल दिलेल्या गाण्याने झाली .

 काळानुरूप आपणही बदलायला काय हरकत आहे.
 नवपरिणीत वधुवर आणि आलेल्या सर्वांनाच माझा सलाम.....................