Thursday, November 17, 2016

१००० आणि ५०० रूपयाच्या नोटांचे रद्दीकरण झाल्यानंतर माझ्या मनात उभे राहिलेले काही प्रश्न



१००० आणि ५०० रूपयाच्या नोटांचे रद्दीकरण झाल्यानंतर माझ्या मनात उभे राहिलेले काही प्रश्न  
१.राजकारणि आणि सरकारी अधिकारी वर्ग लाच मागणे बंद करतील का?
२.राजकिय पक्ष निवडणुकित नोटांच्या ऐवजी धनादेश वापरतील का?
३.उद्योगपती आणि राजकारणि सर्व प्रकारचे कर इमानदारीने भरतील का?
४.कोणत्याही  कामासाठी नोकरशहा पैसे खातात हे बंद होइल का ?
५.बांधकाम क्षेत्रात बदल होउन बिल्डर लोक नोटा देउन बांधकाम नियमावलिला बगल देणे बंद करतील का ?
६. सिग्नलला लपून सामान्य नागरिकांना   दंडाचा धाक दाखवून पैसे उकळणारे  पोलिस चौकात उभे राहुन वाहतुक नियंत्रण करतील का?  
७.दंडाचा धाक दाखवून पैसे उकळण्य़ाऐवजी पोलिस पावती फ़ाडतील का ?
८. याचबरोबर सतत वाहतूक नियम तोडणारे वाहनचालक शिस्तीत वाहने चालवतील का? सतत पोलिसांना नावे ठेवण्यात अर्थ नाही आपणही नियम पाळलेच पाहिजेत
९. बहुतेक राजकारणि लक्षावधी रुपयांच्या गाडीतुन हिंडताना दिसतात ,मोठ्या बंगल्यात राहतात पण कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करतान दिसत नाहित हे थांबेल का ?


हे थांबले नाही तर कोणत्याही नोटा काळ्याच होणार